अंजीर खाल्ल्याने होणारे फायदे
अंजीर
ताज्या अंजीराचा पोषक घटक मुबलक असतात. अंजीरात लोहा हा घटक जास्त प्रमाणात असतो. तसेच त्यात जीवनसत्व एक, याशिवाय चुना, सोडियम, मॅग्नेशियम, गंधक, क्लोरीन, सिलिकॉन, फॉस्फरिक ऍसिड असते. अंजीर खाल्ल्याने जठर क्रियाशील बनते. कडकडून भूक लागते. ज्याच शारीरिक शक्ती क्षीन झाली असेल, थकवा येत असेल अशा लोकांनी रोज दोन ते चार अंजीर खाणे फायदेशीर असते. अंजीर रोज दोन ते चार खावीत कारण ती पचण्यास जड असतात. अंजीर खूप चावण खाल्ल्याने ती पचनास जड जात नाहीत. सुकी अंजीर खाण्यापूर्वी ती एक-दोन तास पाण्यात भिजत ठेवावीत. सकाळी व संध्याकाळी 2 ते 4 अंजिरे दुधात उकळून खाऊन त्यावर दूध पिल्याने रक्त वाढते. शरीरात नवा जोम व शक्ती येते. अतिरिक्त उष्णता नाहीशी होते. कफाचे प्रमाण कमी होते व दमा नाहीसा होतो.

Comments
Post a Comment