Posts

Showing posts from May, 2020

कफनाशक पदार्थ

                      कफनाशक पदार्थ               बकरीचे दुध व ताक, गाईचेे तूप, नवा गुळ, जुना मध, बडीशेप, मूग, मटकी, हरभरा, तूर, हळद, धने, हिंग, मोहरी, लसुन, मेथी, मेथीची भाजी, ओवा, आले, काळीमिरी, लवंग, पिकलेली चिंच, वांगी, कारली, काकडी, लाल कांदा, मुळा, कोबी, शेवगा, खजूर, मनुका, आवळा, पिकलेले टोमॅटो, डाळिंब, काजू इ.

कफकारक पदार्थ

                      कफकारक पदार्थ           गहू, नवा तांदूळ, दूध, लोणी, म्हशीचे तूप, साखर व खडीसाखर, चवळी, दुधी भोपळा, बटाटा, दोडका, रताळे, भेंडी, गवार, फरसबी, द्राक्ष, केळी, पेरू, सीताफळ, बोर, चिक्कुु, संत्रेर,मोसंबी, आंबा, पपई, बदाम, पिस्ता चारोळी इ.

लिंबूचे फायदे

Image
                                      लिंबू             रक्त शुद्ध करण्याचे काम लिंबातील नैसर्गिक आंबटपणामुळे होते व शरीराचे आरोग्य रक्ताच्या शुद्धतेवरच अवलंबून असल्याने आरोग्य टिकण्यासाठी लिंबाची मदत फारच होते.             लिंबाचा रस आंबट असून सुद्धा रक्तातील आंबटपणा दूर करण्याचा गुण त्यात असतो. तसेच तो रक्ताला क्षारांचाही पुरवठा करतो. त्यामुळेच लिंबू स्वादाने आंबट असूनही ते बहुगुणी व उपयोगी फळ होय.               लिंबू पाचकरसांना उत्तेजित करते. जठराग्नी प्रदीप्त करते. लिंबातील सायट्रिक ऍसिड मुळे उदर कृमी नष्ट होतात. तसेच त्यांच्या रसात प्रोटीन, चरबी, नैसर्गिक मीठ, कॅल्शियम, पोटॅश, फॉस्फरस व लोह सुद्धा असते. लिंबात व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्याने रक्तपित्त स्कव्र्ही या रोगात ते अत्यंत उपयुक्त आहे. तसेच दातातून रक्त निघत असेल तर लिंबाचा उपयोग फायदेशीर ठरतो.         ...

लसुण खाण्याचे फायदे

Image
                                    लसुण                आरोग्यासाठी लसुण अत्यंत गुणकारी असल्याने त्याला अमृतासमान मानले जाते. तसेच लसणाची उत्पत्ती अमृतातूनच झाल्याचे मानले जाते. लसून हे उत्तम रसायन आहे. त्याचे सेवनाने मनुष्य निरोगी, तेजस्वी, ताकतवान व दीर्घायुष्यी होतो. जीवनसत्त्वांच्या अभावामुळे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते, त्यांच्यासाठी लसूण अत्यंत फायदेशीर आहे. लसूण स्त्रीयांसाठी अत्यंत गुणकारी आहे. लसणातील उदयशील द्रव्य वाढलेल्या रक्तदाबावर अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्यांना लसुन हितावह आहे. तसेच लसूण मुत्रदोष निवारक व कफनिवारक असतो.             वायुरोगावर लसणासारखे दुसरे प्रभावी औषध नाही. वायुचा नाश करण्याची शक्ती लसणात आहे वातविकारात सुद्धा लसुण उपयुक्त आहे. लसुण पौस्टीक, अस्थिभंग साधणारा, रक्तवर्धक, बलदायक, शरीराचा वर्ण उजळणारा तसेच बुद्धि व डोळ्यांसाठी हितावह आहे. लसणाच्या पाकळ्या ...

कांदा खाण्याचे फायदे

Image
                                    कांदा            आयुर्वेदात कांदा हे उत्तम रसायन, श्रेष्ठ औषध व पौस्टीक आहार होय. कांद्यात पांढरा व लाल अशा दोन जाती आहेत. गुणवत्तेच्या दृष्टीने पांढरा कांदा उत्तम. लाल कांद्यात लोह तत्व जास्त असते. कांदा शक्तीदायक शरीर सदृढ बनविणारा व बुद्धीवर्धक मानला जातो. कांदा प्रत्येक ऋतूत सारखाच उपयुक्त असतो. तो वात, पित्त व कफ या तीन्ही विकारावर गुणकारी आहे. कांद्याच्या सेवनाने वातप्रकोप शांत होतो. दूषित पित्त मलमार्गाने बाहेर निघून जाते व नवे चांगले पित्त उत्पन्न होते तसेच कफ नाहीसा होतो. कांद्याच्या सेवनाने आतड्यांची कार्यशक्ती वाढते व शौचशुद्धी होते. कांद्यामुळे आलोचक पित्त वाढते त्यामुळे कांद्याचे सेवन रोज केल्याने डोळे सक्षम  बनवतात. चमकदार व तेजस्वी दिसतात.        कांदा खाल्याने गळ्यात व तोंडात चिकटपणा राहत नाही. तोंड स्वच्छ होते, दात दुधासारखे शुभ्र राहतात.स्मरणशक्ती वाढते व दुर्बल झालेले स्नायू मजबूत बन...

मधाचे फायदे

Image
                                      मध          मध हे केवळ औषध नसून ते दुधाप्रमाणे पौष्टीक व संपूर्ण खाद्य आहे. मधातील लोह वगैरे क्षार रक्तात आम्लविरोधी बनवतात. मधामुळे रक्तातील लाल कणांची वाढ होऊन रक्ताचा फिकटपणा दूर होतो. मधामुळे उष्णता व शक्ती प्राप्त होते. मधामध्ये 'बी' जीवनसत्व चे प्रमाण अधिक असल्याने त्याचे सेवनाने त्वचा विकार उद्भवत नाहीत. आहारात जेथे जेथे साखर व तुपाचा वापर केला जातो तेथे तेथे मधाचा उपयोग करता येतो. मध नुसता किंवा भाकरी बरोबर खाता येतो.लहान मुले अशक्त लोक व वायू असणाऱ्यांना मध सेवन करणे फायदेशीर असते. रोज दोन ते चार तोळे मध सेवन केल्याने हृदय सुदृढ बनते.मधाचे सेवनाने चरबी कमी करण्यासाठी पाण्यात थोडा मध व लिंबाचा रस घालून दीर्घकाळ पिणे आवश्यक असते.         खरा मध ओळखण्यासाठी मधात कापसाची वात बुडवून ती पेटवले असता आवाज न करता ती पेटत राहिली तर तो अस्सल समजावा.कुत्रा अस्सल मद खात नाही तसेच  चोळून ठेवलेल्या खा...

लोणी व तुपाचे फायदे

Image
                                लोणी व तूप              लोणी अत्यंत मृदू असते ते लहान थोरांना अमृतासमान असते. लोणी पचण्यास दुधापेक्षा हलके असून त्वरित रक्त बनविणारे आहे. लोण्याचे सेवनाने शरीर सुकुमार बनते. ते अग्निदीपक असल्याने त्याच्या सेवनाने कडकडून भूक लागते. लोण्याच्या नियमित सेवनाने चष्मा येत नाही. ताजे लोणी शितल, बुद्धिवर्धक व शरीराचा सर्वतोपरी विकास करणारे म्हणजेच शरीर पुष्ट करणार आहे. खूप दिवसांचे शिळे लोणी खाऊ नये. कारण ते उलटी, कफकारक, जड, मेद वाढवणारे, कोड निर्माण करणारे असते. सर्व प्रकारच्या लोण्यात गाईचे लोणी उत्तम होय.                   रोजच्या जेवणात कमी-अधिक प्रमाणात तूप असणे आवश्यक आहे. तुपामुळे शरीरातील सातही धातूंची वाढ होवून शरीर बलवान बनते. त्यामुळे सर्वांगीन आरोग्यासाठी तुपाचा वापर करणे फायदेशीर ठरते. तुपामुळे वाताचे वाढलेले प्रमाण कमी होते. शरीरातील पित्ताचे प्रमाण व्यवस्था बनवते. तसेच क्षीण झालेल्या...

ताकाचे फायदे

Image
                                        ताक                    आयुर्वेदानुसार 'अमृत' देवांना जसे प्रसन्नता देते तसेच पृथ्वीतलावर ताक मानवास प्रसन्नता देते. भवमिश्रांचे नुसार ताकाचे नियमितपणे सेवन करणारे व्यक्ती रोग व्याधी पासून मुक्त राहते. तसेच जे रोग बरे झालेले आहेत ते ताक सेवनाने परत उद्भवत नाही अशा प्रकारे ताकामध्ये मौलिक गुणधर्म आहेत. ज्या लोकांना दूध आवडत नाही अथवा पचत नाही अशा लोकांसाठी ताक अत्यंत गुणकारी होय.           ताकामुळे जठराग्नी प्रदिप्त होऊन पचनव्यवस्था कार्यक्षम बनते. त्यामुळे जेवल्यानंतर ताक पिल्याने अन्नाचे चांगल्याप्रकारे पचन होते. त्यामुळे पचन व्यवस्था सुधारते. शरीरातील आंतरिक विषारी घटक नष्ट होतात. हृदय मजबूत बनते. रक्त शुद्ध होते. शरीराचा वर्ण व कांती तेजस्वी होते. वृद्धावस्था उशिरा येते. चेहर्‍यावर सुरकुत्या पडत नाहीत. सुरकुत्या पडल्यास त्या दूर होतात. ताक वायुनाशक आहे. तसेच ते कफशोष...

दहीचे फायदे

Image
                                      दही               दुधात विरजण घालून दही बनते. ते रुचकर व अग्निदीपक असल्याने ते दुधापेक्षा ही गुणकारी असते. जास्त आंबट नसलेलं चांगले व मधुर दही उत्तम असते. आंबट दही हे रक्त दूषित करणारे तसेच वायू व पित्त निर्माण करणार असते.     नुसते दही खाण्यापेक्षा त्यात मध घालून खाल्ल्याने डोळ्यात चिकट स्त्राव होत नाही. किंवा डोळे चिकटत नाहीत. मुगाच्या डाळीबरोबर दही घेतल्याने वातघ्न गुणांची वृद्धी होऊन कफ वृद्धी कमी होते. आवळा चूर्ण बरोबर दही घेतल्याने रक्त व पित्ताची रोग होत नाहीत. त्यामुळे नुसते दही खाण्यापेक्षा त्यात साखर, गूळ, मध किंवा तूप घालून सेवन करावे. किंवा मुगा बरोबर किंवा तुरीच्या वरणाबरोबर सेवन करावे. दही खाण्याचे प्रमाण दोन ते तीन तोळे एवढीच आहे. साखरेबरोबर दही खाल्ल्याने त्यातील पाच शक्ती वाढते. तसेच ते पित्तनाशक,  तृषाशामक, रक्तदोष, व दाहनाशक असते. सर्व दह्यात गाईचे दही हे अधिक गुणकारी असते. रात्र...

दुधाचे फायदे

Image
                                  दूध               दूध हे धातुवर्धक व बलकारक असल्याने दुधासारखे त्रैलोक्यात दुसरे औषध नाही. दुधाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीर निरोगी बनते. तसेच दुधामध्ये सी जीवनसत्व शिवाय शरीराला आवश्यक असणारे सर्वच पोषक घटक व जीवनसत्त्वे आहेत. दूध हे जीवनदायी रसायन असल्याने त्याला 'अमृत' म्हटले जाते.             सर्व प्रकारच्या दुधामध्ये गाईचे दूध सर्वोत्तम होय. गाईचे दूध औषधी व आरोग्यदायी असून अनेक रोगांमध्ये ते उपयुक्त असते. साधारणत: सर्वांनीच दूध घेणे आवश्यक आहे. तथापि ज्यांना गॅस होतो व ज्यांची पचनशक्ती क्षीण आहे अशांनी दुधात सुंठ, वेलची, पिंपळी अशा पाचक पदार्थाचा मसाला दुधात टाकून दूध उकळून प्यावे. लहान मुलांना अथवा पचनशक्‍ती कमकुवत असणाऱ्यांना दूध देताना त्यात तीन भाग पाणी घालून गरम करूनच घ्यावे.              साखर घातलेले दुधाने कफ वाढतो ते वायुनाशक असते. खडीसाखर...

चिक्कूचे फायदे

Image
                                चिक्कू             चिक्कू खूप थंड पित्तशामक, पौष्टिक, गोड व रुचकर असतात. चिक्कूत ए जीवनसत्व विपुल प्रमाणात व सी जीवनसत्व थोड्या प्रमाणात असते. त्यात 14 टक्के शर्करा तसेच फॉस्फरस व लोह भरपूर प्रमाणात असते. थोड्या प्रमाणात क्षारही असतात. त्यामुळे चिक्कू आहार म्हणून फायदेशीर असतात.चिक्कूचे सेवनाने शरीरात एक प्रकारचा जोम व उत्साह संचारतो. त्यातील शर्करा रक्तात मिसळून मनुष्याला ताजेतवाने बनवते. चिक्कूच्या सेवनाने हमखास फायदा होतो. ताजे व पिकलेले चिक्कू खूप फायदेशीर असतात. कच्च्या चिक्कूमुळे मलावरोध होतो. पोटात खूप दुखते. न चावता किंवा अतिरिक्त प्रमाणात चिक्कू खाल्ल्याने पोटाला जड पडतात. चिक्कू साखरेबरोबर खाल्ल्याने धातू पुष्टी होते. तसेच लघवीची जळजळ कमी होते.

संत्र्याचे फायदे

Image
                                संत्री                  संत्री शरीरातील अतिरिक्‍त उष्णता दूर करणारी रक्तवर्धक व रक्त सुधारणांसाठी असतात.संत्रीच्या सेवनाने जठराचा व आतड्याचा मार्ग स्वच्छ होऊन दोन्ही अवयवांची पचनशक्ती वाढते. तापामध्ये व उन्हाळ्यात संत्र्या सारखी तहान भागवणारे दुसरे फळ नाही.          संत्र्यात सी जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असते. तसेच लोह व कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्याने वजन वाढते. रक्तातील फिकटपणा दूर होतो. रक्त लाल रंगाचे होते. रक्त वृद्धी होते. दात व हाडे मजबूत बनतात. संत्र्यात फॉस्फरस व खनिज द्रव्येही असतात. संत्री संधिवातासारख्या रोगावर रामबाण समजले जातात. हाता पायात कळा, सांधे दुखणे  यात फायदा होतो. संत्रामुळे खडबडीत व काळा पडलेल्या त्वचेत चेतना येते. त्वचा मऊ व मुलायम बनते.संत्रीतील जास्त प्रमाणात असलेल्या खनिज क्षारामुळे शरीरातील आम्लता कमी होते. संत्र्यामुळे  लघवीचा पिवळेपणा व दाह दूर होतो. डोळ्यातील...

पपईचे फायदे

Image
                            पपई                      पपई इतर फळांच्या तुलनेत  ए जीवनसत्व अधिक प्रमाणात असते. त्यामुळे नेत्ररोग, मूत्राशय तसेच गुद्दद्वार चे रोग शारीरिक वृद्धी रोग इत्यादी रोगापासून पपई मनुष्याचे रक्षण करते. तसेच पपई सी जीवनसत्वही मुबलक असते. पपई जशी अधिक पिकेल तसे त्यातील सी जीवनसत्व वाढत जाते. पपईत सी जीवनसत्व मुबलक असल्याने त्याचे सेवनाने अस्थीरोग, दंतरोग, उच्च रक्तदाब, पक्षाघात, गाठीचा संधिवात या रोगांपासून संरक्षण होते. पपईतील कारपेन या क्षारीय द्रव्यामुळे आतड्यातील कृमी लिव्हर व प्लीहा विषयक रोग बरे होतात. पपई पोटाच्या विकारासाठी अत्यंत गुणकारी आहे. पपईमुळे पचनक्रिया सुधारते, भूकही लागते व शरीराचे कार्यशक्ती वाढते. दुसऱ्या आहार पचण्यास मदत होते, हृदय रोगासाठीही पपईचे सेवन हे उत्तम औषध आहे. प्रातर्विधी आटपून एक चमचा साखरेत कच्च्या पपईत सुई खुपसून तिचे दूध काढून पंधरा ते वीस थेंब घालून साखर घालून खाल्याने हृदयरोगात अत्यंत फायदा होतो. ह...

आवळाचे फायदे

Image
                                    आवळा              आयुर्वेदात आवळ्यास सर्वात श्रेष्ठ मानतात. आवळा हे त्रिदोष नष्ट करणारे व एक उत्तम रसायन होय. आवळा रक्तातील अतिरिक्त उष्णता व त्याची तीव्रता कमी करतो. रक्तातील साचलेली विषद्रव्ये मळ दूर करून रक्त शुद्ध करतो. मांसधातूत प्रवेश करून मांसातील मळ जातो व पेशींना शुद्ध करतो. याप्रकारे आवळ्यांचा शरीरातील सर्व धातूंवर प्रभाव पडत असल्याने ते भरपूर रासायनिक गुण असणारे फळ आहे. आवळ्यात यौवन टिकून ठेवण्याचे गण आहेत. आवळ्यात अमृत समान गुण असल्याने त्याला अमृत फळ असे म्हणतात. आवळ्याच्या नियमित सेवनाने वृद्धत्व लवकर येत नाही. आवळ्यात सी जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असून त्यात लोह हा घटकही भरपूर असल्याने शरीरात नवीन रक्त निर्माण करण्यास आवळा अत्यंत उपयुक्त ठरतो. आवळा आंबट असल तरी त्यातील मधुरशीतल गुणामुळे त्याच्या सेवनाने पित्त न वाढता पित्तप्रकोप शांत होतो. हिरडा, बेहडा व आवळा यांचे समप्रमाणात चूर्ण एकत्र करून त्रिफळा चूर्ण बनत...

पेरू खाण्याचे फायदे

Image
                                  पेरू                पेरू हे सात्विक व बुद्धी वर्धक फळ असून त्यामध्ये इतर फळांपेक्षा सी जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. तसेच त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, ग्लुकोज, टॅनिन ॲसिड इ. शरीराला आवश्यक घटक असल्याने दुपारी जेवल्यानंतर एक दोन तासानंतर एक मोठा पेरू खाणे अत्यंत फायदेशीर असते. पेरूतील जीवनसत्वे सी व इतर घटकांमुळे दंतरोग, दुर्बल पचनसंस्था, रक्तदाब, रक्तविकार इ. विकार नाहीसे होतात. तसेच त्यात पित्तशामक गुण असल्याने अत्यंत उपयोगी फळ आहे. पेरूच्या फोडीवर मिरपूड घातल्याने त्याचा वातूलपणा कमी होतो. पेरूच्या पानांच्या काढ्याने गुळण्या केल्याने हिजड्याची सूज व मुखविकार नाहीसे होतात.

नारळाचे फायदे

Image
                              नारळ             ओल्या खोबऱ्यात कॅलरीज कार्बोहायड्रेट व खनिज क्षार पुष्कळ प्रमाणात असतात. तसेच त्यात जीवनसत्वे व सर्व आरोग्यदायक घटक मुबलक प्रमाणात असतात. तथापि त्याचे प्रमाण सुक्या खोबऱ्यात कमी असते. त्यामुळे ओले खोबरे हे हे मनुष्याला धष्टपुष्ट बनविणारे अत्यंत उपयुक्त फळ आहे. लहान मुलांना गूळ किंवा साखरेबरोबर खोबरे खायला दिल्याने त्यांचे शरीरात चरबी वाढते व शरीर धष्टपुष्ट बनते. साधारण नोव्हेंबर ते जानेवारी हे तीन महिने कृश शरीर असणाऱ्या तरुणांनी सकाळी खोबरे व गुळ चावून खाल्ल्याने त्यांच्या हाडांची वाढ होते. छाती भरदार होते व शरीर धष्टपुष्ट बनते नारळ पचण्यास जड, थंड, मूत्राशय स्वच्छ ठेवणाऱ्या, जुलाब विरोधक, बलदायक, पित्त, रक्तदोष व दाह दूर करणारा आहे. हृदय रोग असणाऱ्यांना नारळ आरोग्यदायक आहे.

अंजीर खाल्ल्याने होणारे फायदे

Image
                              अंजीर                ताज्या अंजीराचा पोषक घटक मुबलक असतात. अंजीरात लोहा हा घटक जास्त प्रमाणात असतो. तसेच त्यात जीवनसत्व एक, याशिवाय चुना, सोडियम, मॅग्नेशियम, गंधक, क्लोरीन, सिलिकॉन, फॉस्फरिक ऍसिड असते. अंजीर खाल्ल्याने जठर क्रियाशील बनते. कडकडून भूक लागते. ज्याच शारीरिक शक्ती क्षीन झाली असेल, थकवा येत असेल अशा लोकांनी रोज दोन ते चार अंजीर खाणे फायदेशीर असते. अंजीर रोज दोन ते चार खावीत कारण ती पचण्यास जड असतात. अंजीर खूप चावण खाल्ल्याने ती पचनास जड जात नाहीत. सुकी अंजीर खाण्यापूर्वी ती एक-दोन तास पाण्यात भिजत ठेवावीत. सकाळी व संध्याकाळी 2 ते 4 अंजिरे दुधात उकळून खाऊन त्यावर दूध पिल्याने रक्त वाढते. शरीरात नवा जोम व शक्ती येते. अतिरिक्त उष्णता नाहीशी होते. कफाचे प्रमाण कमी होते व दमा नाहीसा होतो.

सिताफळाचे फायदे

Image
                              सिताफळ                अशक्तपणा दूर होऊन अंगात शक्ती येण्यासाठी सिताफळ हे अत्यंत उपयुक्त फळ आहे. सिताफळ हे पौष्टिक, मांसवर्धक, रक्तवर्धक, बलवर्धक असल्याने अशक्त व कृश व्यक्तींना, वजन वाढत नसेल अशांना सीताफळ हे उत्तम फळ आहे. सिताफळ हृदयांच्या मांसपेशींचे बळ वाढवून हृदयाची क्रिया सामान्य बनवते. त्यामुळे ज्यांचे हृदय दुर्बल असेल हृदयाचे स्पंदन वाढत असेल व घाबरल्यासारखे वाटत असेल त्यांना सीताफळ फायदेशीर आहे. सिताफळ शरीरातील स्नायूंना पुष्ट बनवते. सीतफळ थंड असल्याने पित्त दूर करते मात्र त्याच्या अतिसेवनाने थंडी वाजून ताप येतो. आजारपण येतो.

द्राक्षाचे फायदे

Image
                                द्राक्ष              निसर्गाने मानवास दिलेला द्राक्ष हा उत्तम प्रकारचा मेवा आहे. द्राक्ष ही लहान मुले, तरुण, वृद्ध अशा सर्वांनाच सर्व व्याधींमध्ये फायदेशीर व गुणकारी असतात. द्राक्षाच्या सेवनाने शरीरातील अतिरिक्त उष्णता दूर होते. रक्त शुद्ध होते. पित्तप्रकोप शांत होतो. द्राक्षातील सी जीवनसत्वामुळे त्वचारोग बरे होतात. द्राक्षाचे सेवनाने शरीरात स्फूर्ती व उत्साह संचारत शरीर स्वस्थ निरोगी व बलवान बनते. द्राक्षात ए, बी, सी जीवनसत्वे तसेच लोह व शरीरात शक्ती निर्माण करणारे घटक असतात. याशिवाय पोटॅशियम सेल्युलोज, शर्करा, कार्बनिक आम्ल असल्याने द्राक्षाच्या सेवनाने मलावरोध नाहीसा होतो. पौष्टिकतेच्या दृष्टीने इतर कोणत्या ही फळांपेक्षा द्राक्ष अत्यंत उत्तम आहेत. द्राक्ष व साखर एकत्र तोंडात ठेवून चघळल्याने खोकला बरा होतो. आंबट किंवा कच्ची द्राक्षे खाऊ नयेत.

अंबा खाल्ल्याचे फायदे

Image
                                    आंबा               आंबा सर्व फळात श्रेष्ठ असल्याने त्याला फळांचा राजा असे म्हणतात. चांगली पिकलेली अंबे सेवन केल्याने शरीराची कांती सुंदर व तेजस्वी बनते. शरीरात रसधातू भरपूर निर्माण होऊन मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र इ. सर्व धातूंची वृद्धी होते. हिमोग्लोबिन व लाल कण वाढतात. कफ वाढत नाही. आंबे आतड्यातील उत्तम टॉनिक आहे. जठरातील पचनसंस्थेचे रोग, फुप्फुसाचे रोग व रक्त कमी असल्याने होणारे रोग नाहीसे होतात. आंब्याचे दुधाबरोबर सेवन केल्याने त्याचे गुणधर्म वाढतात. कच्ची तेरी खाल्ल्याने मंदान्गी, रक्तविकार, मलावरोध, पोटाचे विकार व नेत्र रोग होतात. पिकलेल्या आंब्यात 'ए' हे जंतुनाशक जीवनसत्वे तर 'सी' हे त्वचारोगहारक जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते

टोमॅटो खाण्याचे फायदे

Image
                              टोमॅटो           टोमॅटो हे अतिशय महत्त्वाचे उपयुक्त फळ आहे.शरीर संवर्धनास लागणारे मुख्य लोह व दुसरे क्षार टोमॅटोमध्ये मुबलक प्रमाणात असल्याने त्यात रक्त निर्माण करण्याची इतरपेक्षा अनेक पटीनेमो जास्त असते. टोमॅटोमध्ये सहा प्रकारच्या जीवनसत्व पैकी पाच जीवनसत्वे असतात. पिकलेल्या टोमॅटोत एक,बी,सी जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळेच रोज एक ते दोन पिकलेल्या टोमॅटोची सेवन केल्याने डॉक्टरची गरज निर्माण होत नाही. लहान मुलांना पिकलेल्या टोमॅटोचा रस दिवसातून दोन ते तीन वेळा प्यायला दिल्याने मुले निरोगी, बलवान व धष्टपुष्ट  बनतात. सकाळ संध्याकाळ टोमॅटोचा रस सेवन केल्याने जठराग्नी प्रदीप्त होतो. पचनशक्ती वाढते. मुळव्याध, पांडुरोग, मलावरोध नाहीसा होतो. ठिसूळ झालेल्या हिरड्यातून येणारे रक्त बंद होते. त्वचेवर लहान पुरळ उठणे, लाल डाग पडणे, कंड सुटणे इ. रक्त विकार दूर होतात. दृष्टी स्वच्छ होते व दृष्टीचे तेज वाढते. टोमॅटो जरी गुणकारी असले तरी मुतखडा, सूज, संधि...

खजुराचे फायदे

Image
                                खजूर            खजूर अति पौष्टिक, बलवर्धक, शक्तिवर्धक असून तो धातू वृद्धी करतो. तसेच खजुरात ए, बी,ही जीवनसत्वे पुष्कळ प्रमाणात तसेच लोह कॅल्शियम तांबे फॉस्फरस असल्याने तो एक पौष्टिक आहार मानला जातो. खजुरातील 'ए'जीवनसत्वामुळे शरीरातील अवयवांचा चांगला विकास होतो. बी जीवनसत्वामुळे हृदय, इंद्रिये, शरीर सुदृढ बनते. पचनसंस्था मजबूत बनून भूक चांगली लागते. शरीर व आतड्यातील मांसपेशी सशक्त बनतात. खजूर आतडी व शरीर स्वच्छ ठेवण्याचे कार्य करतो. त्यातील सी जीवनसत्वामुळे शरीरातील प्रतिकारक शक्ती चांगली बनल्याने बाहेरील कोणत्याही ही विषारी जंतूचा शरीरावर परिणाम होत नाही. व जंतू शरीरात प्रवेशही करू शकत नाहीत. अशक्तपणा घालवण्यासाठी, वजन वाढण्यासाठी, खजूर दुधात उकळून खाल्ल्याने फायदा होतो. एक वर्षापर्यंत मुलास एक खजूर २ ते ५ वर्षापर्यंत २ ते ४,५ ते १६ वर्षापर्यंत १० ते १६ वर्षानंतर च्या सर्वांना १५ ते १६ खजूर सेवन करण्याचे प्रमाण आहे.अर्थात आपणास पचेल त्याप्रमा...

गाजराचे फायदे

Image
                            गाजर         गाजर ही मानवास निसर्गाकडून मिळालेली अनमोल भेट आहे. गाजर फळ आहे व भाजी ही आहे. महागड्या फळांपेक्षा व भाज्यापेक्षा शक्तीचे भांडार असणारे स्वस्त गाजरे शरीरासाठी उत्तम शरीर वर्धक आहे. ताजी गाजरे खाल्ल्याने शरीरास त्याचा लाभ होतो.गाजराची कोशिंबीर किंवा त्याच्या बारीक तुकड्यावर मीठ, हळद, धने, जिरे घालून खाल्ल्याने त्यातील पोस्टीक घटकांचा जास्त होतो. गाजरात ए एजीवनसत्व विपुल प्रमाणात असते. गाजराचे सेवनाने शरीर मुलायम व सुंदर बनते. शरीरात शक्ती निर्माण होते वजन वाढते. शारीरिक व बौद्धिक विकास होतो. गाजर पोट व आतड्यावरील रोगावर रामबाण औषध आहे. गाजरातील लोहामुळे रक्त वाढते. गाजरातील गंधकयुक्त घटकामुळे रक्तशुद्धी होते. तसेच कंड सुटणे, नायटा, फोड येणे त्वचा विकारात फायदा होतो. गाजराच्या मोसमात सर्वांनीच मुबलक उपयोग करावा. गाजर खाऊन त्यावर पाणी पिल्याने खोकला लागतो. गाजर जास्त खाल्ल्याने पोट दुखू लागले तर गुळ खावावा.

दररोज सफरचंद खाण्याचे फायदे

Image
                              सफरचंद     रोज एक सफरचंद खा डॉक्टरला दूर ठेवा.तसेच झोपण्यापूर्वी जर सफरचंद खाण्यात आले तर डॉक्टर नुसता हात चोळत बसेल म्हणजेच आपणास कोणतेही आजार होणार नाहीत.अशा तऱ्हेने इंग्रजीत सफरचंदाचे महत्त्व सांगितले आहे सफरचंदं पचनशक्ती वाढते तसेच रक्त शुद्ध करते. सफरचंदाचे सेवनाने हिरड्या मजबूत होतात. शरीरातील विषारी द्रव्ये दूर होतात.रक्तदाब कमी करण्यासाठी तसेच जठरातील आंबटपणा दुर करण्यासाठी सफरचंद अमृत समान आहे. झोपताना सफरचंदाचे सेवन केल्यास मेंदू शांत राहतो व झोपही शांत लागते. सफरचंदात इतर फळांपेक्षा फॉस्फरसचे प्रमाण सर्वात जास्त असते. शरीरात ते चांगल्याप्रकारे शक्ती व उष्णता पुरवते. सफरचंदात लोहाचा अंशही जास्त असतो. ते रक्त व मेंदू दुर्बल असणाऱ्यांना फायदेशीर असते. सफरचंदातील फॉस्फरस व लोह मानसिक अशांती वरील उत्तम औषध असून ज्ञानतंतू च्या व मेंदूच्या दुर्बलतेवर ते उत्तम पौष्टिक फळ होय. सफरचंदात टार्टारिक ॲसिड असल्याने ते लवकर पचते तसेच इतर खाल्लेले अन्न ही लवकरच असते

केळी खाण्याचे अनेक फायदे

Image
                                केळी केळीमध्ये खनिजद्रव्ये विपुल प्रमाणात असल्याने तसेच कॅल्शिअम व मॅग्नेशिअम चे प्रमाण फॉस्फरस पेक्षा जास्त असल्याने पोषक घटकांचे दृष्टीने खेळ हे मौल्यवान  गुणकारी फळ होय.मुलांच्या शरीराच्या विकासासाठी केळीतील कॅल्शिअम व फॉस्फरस घटक अत्यंत उपयुक्त असतात. केळांच्या सेवनाने मुलांचे शरीर फिकट पडत नाही. केळीमध्ये रक्तवाढीसाठी लागणारे लोह, तांबे, मॅगनीज असते. केळ्यातील लोह रक्तास लाल व शुद्ध ठेवते. केळात ए, बी,डी,जी,इ.व एच ही जीवनसत्वे पुष्कळ प्रमाणात तसेच क्लोरीन, पोटॅशियम, सोडियम, गंधक, सिल्का सारखी अत्यंत उपयोगी व पौष्टिक खनिज पदार्थ असतात. ज्यांना केळी पचत नाहीत अशांनी केळी खाऊ नये. तसेच केळी खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिल्याने सर्दी होते. त्यामुळे लगेच पाणी पिऊ नये.केळी आतड्यात अन्न कुजण्याच्या प्रक्रियेस प्रतिबंध करतात. त्यामुळे आतड्यांचे रोग होत नाहीत.केळी संध्याकाळी खाल्याने त्याची किंमत सोने इतकी असते